मुंबई | गणेशोत्सवासाठी देशातील वेगवेगळ्या भागांमधून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणाचाही विरोध नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासन कटिबंध आहे. असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलेले आहे.
सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती यावेळी पालकमंत्री महोदयांसह स्थानिक प्रशासकीय अधिकारी सुद्धा उपस्थित होते. यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली.
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा खर्च शासनाने करावा .तसेच चाकरमान्यांना विलगीकरण कक्षात 14 दिवस ठेवण्यापेक्षा सात दिवस ठेवावे. तसेच त्यांना येत असताना टोल माफ सुविधा ठेवावी त्यांच्या व्यवस्था आणि प्रवासाचे नियोजन ,तसेच covid-19 तपासणी करणे हे सर्व खर्च शासनाने करावे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आलेली आहे असं उदय सामंत यांनी सांगितले.
चाकरमान्यांनी गणपतीला आलेच पाहिजे हीच आमची भूमिका आहे. तसेच कोकणात येणाऱ्या सर्व चाकरमान्यांचे विशेष काळजी घेण्यात येईल. त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये त्यांना कोकणात येण्यास कोणत्याही प्रकारचा विरोध नाही असे सुद्धा सामंत यांनी यावेळी सांगितले
इथे ही वाचा
नवरदेव नवरीला कोरोना.. या लग्नाने प्रशासनाची उडवली झोप..
नवरदेव नवरीला कोरोना.. या लग्नाने प्रशासनाची उडवली झोप..
सरकारस्थापनेबाबत भाजपशी चर्चा झाली होती का?, शरद पवारांचा गौप्यस्फोट म्हणाले…