मुंबई | गेल्या काही दिवसांत सोनू सूदने कधी स्वतः पैसे खर्च करत तर कधी चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून स्थलांतरित कामगारांना बस, रेल्वे, विमानाने घरी पाठवलं. सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे…
सोनू सूद याची कामगगिरी एकदम योग्य पणे पार पाडली आहे.
एखादी राजकीय, शासकीय, प्रशासकीय यंत्रणा पाठीशी असल्याशिवाय सोनू सूद हे सर्व करू शकेल काय ? कुणाला मुंबईतून उत्तर प्रदेशात जायचे असेल तर आपल्या मोबाईल नंबरसह एक मेसेज करा. सोनू सूद तुम्हाला घरी पोहोचवेल, असा प्रचार ठरवून झाला. त्या प्रचारासाठी मोठी राजकीय यंत्रणा कामाला लावली गेली. सरकार मजुरांसाठी काम करत नाही. पण सोनू सूद करतोय हे बिंबवण्याचा प्रयत्न झाला. सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते, अशी टीका राऊत यांनी केली आहे
इथे हि वाचा
गेल्या २४ तासात 1 लाख ४२ हजार रुग्णांची तपासणी तर एकूण आता पर्यंत रुग्ण तपासण्यात आले
आज राज्यात 2739 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ..
आलिया दारात अजब वरात पाटील-मुनेश्वर यांचा अनोखा बौध्द संस्कार विधी विवाह सोहळा लॉकडाऊन काळात झाला संपन्न